नमस्कार!!
निसर्ग म्हणजे रंग तयार करणारा अनोखा रंगकर्मी!! त्याच्या रंगनिर्मितीला तोड नाही.सूर्य उगवताच आनंदाने उधळलेला नारिंगी-पिवळसर रंग,अस्ताला जाताना विरहाने उमटलेला लालसर-नारिंगी रंग,गर्द सावलीच्या शांततेला मिळालेला काळसर-पांढरा रंग,हिरव्या हिरवळीतील चैतन्याला दिलेला हिरवा-पोपटी रंग,मृदेच्या पालन क्षमतेतील काळसर-तांबडा रंग आणि त्यातून उमलणाऱ्या रोपट्यातील पोषणाचा मात्र हिरवाच रंग!!!अशा अनेकानेक रंगांच्या या रंगकर्मी पुढे सदैव नतमस्तक व्हावे!!!
🌹आजचा रंग: गहन निळा
शांती निदर्शक असा निळा रंग! शीतलता आणि स्निग्धता ही या रंगाची वैशिष्ट्ये आहेत. समुद्र आणि अवकाशाचा अमर्याद विस्तीर्ण पसारा सामावून घेणारा हा रंग विश्वासाचं, श्रध्येचं, सुस्वभावाचं, आत्मीयतेचं प्रतिक आहे!! निळा रंग सुस्वभावी देवी नारायणीशी संबंधित आहे!!!
🌹 या रंगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची पाचवी माळ गुंफुया!!
⚡ पाचवी माळ स्त्री-सामर्थ्याची⚡
⚡ डॉ.श्रुती पानसे⚡
🌹 परिचय:
🌹
डॉक्टरेट- मेंदू व शिक्षण
◾अंकुर माध्यम तर्फे शाळा,कॉलेज मध्ये मुलांच्या मेंदूत डोकवूया यावर कार्यशाळा.
◾सामाजिक-शैक्षणिक संशोधन प्रकल्पात सहभाग.
◾विशेष व सामान्य मुलांसाठी शैक्षणिक साहित्यनिर्मिती
◾शैक्षणिक संस्थांचे डॉक्युमेन्टेशन
◾दैनिक सकाळ,दैनिक लोकसत्ता,दैनिक लोकमत मध्ये लेखमाला प्रकाशित
◾टी.व्ही आणि आकाशवाणीवर शिक्षणविषयक चर्चांमध्ये सहभाग
🌹 प्रकाशित पुस्तके
१. पाळणाघर असं असावं
२.अशी का वागतात मुलं
३.अभ्यास आनंददायी कसा कराल?
४. मुलांचे ताण जबाबदारी पालकांची
५. आधुनिक स्फूर्तिकथा
६.दफ्तराचे ओझे
७.गृहपाठ
८.शिक्षा
९.डेअर टू ड्रीम्स
१०.उत्तरांच्या वाटेवर
११.व्यक्तिमत्त्व विकास..इयत्ता-९वी
१२.व्यक्तिमत्त्व विकास..इयत्ता-१०वी
१३.डोक्यात डोकवा
१४. बहुरंगी बुद्धिमत्ता
१५.पहिली आठ वर्षे
१६. टीन एजर्सच्या मनात
॥ज्ञानभाषा मराठी॥
॥माझी शाळा📚माझी भाषा॥
◾ सुचिकांतजी:
सर्वांना नमस्कार,
मी सुचिकांत, || ज्ञानभाषा मराठी || समूहाच्या #माळ_स्त्रीसामर्थ्याची या उपक्रमांतर्गत आयोजित मुलाखतीत डॉ. श्रुती पानसे यांचे स्वागत करतो. 💐
श्रुती पानसे:
👍🏼😀
◾ सुचिकांतजी:
ताई, मानवाचा मेंदू सर्वात जास्त सामर्थ्यशाली अवयव आहे. तुम्ही PHD साठी मेंदू आणि शिक्षण हा विषय घेतलात त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम अभिनंदन!
श्रुती पानसे:
महत्वाचाच आहे हा विषय
◾ सुचिकांतजी:
हो .. खूपच ..
तुम्हाला हाच विषय अभ्यासावा असं का वाटलं त्यावेळी ?इतर कोणते पर्याय होते तुमच्यासमोर ?
श्रुती पानसे:
खरतर मी एम. ए. मराठी आहे.
सुचिकांतजी:
अरे वा ..
श्रुती पानसे:
पण शिक्षण महत्वाचा विषय वाटला.
सुचिकांतजी:
अच्छा ..
श्रुती पानसे:
पुण्यात मनपा शाळातल्या पहिलीच्या मुलींवर पीएचडीचा अभ्यास. कारण त्यांच्या पालकांची अजूनही शिक्षणाची पार्श्वभूमी नसते. आधुनिक मेंदूसंशोधन ही नवीन तंत्रज्ञान एफ एम आर आय ची देन आहे. याचा शास्त्रीय अभ्यास पाश्चात्य देशांमध्ये झालेला आहे.
याचा भारतीय संदर्भात अभ्यास करावासा वाटला. त्यातही आर्थिक वंचित घटकावर. म्हणून हा विषय निवडला.
सुचिकांतजी:
मस्तच ...
श्रुती पानसे:
अभ्यास करताना वेगळे अनुभव आले.सरकारी शाळाही अभ्यासता आल्या.
मला असं जाणवलं की मुलं सगळीकडे सारखीच असतात. फरक पडतो ते त्यांना कसे अनुभव मिळाले आहेत आणि सकस आहार मिळालाय की नाही यावर.
◾ सुचिकांतजी:
यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिके असतीलच ना ? मग कधी मेंदूचे डॉक्टर झाल्याचा अनुभव आला का ? डॉक्टरांकडून काही न मिळाले का ?
श्रुती पानसे:
नाही.
सुचिकांतजी:
अच्छा ..
श्रुती पानसे:
अगदी उलट अनुभव.
सुचिकांतजी:
उदा.
श्रुती पानसे:
उपलब्ध मशीनरी बघू दिली नाही
सुचिकांतजी:
ओह ..
सुचिकांतजी:
पण ती गरजेची असेल ना!!
श्रुती पानसे:
हा अभ्यास नेट वर केला मग!!मूलभूत नाही झालं संशोधन!!Appliedझालं.पण करण्याची इच्छा आहे.Post doctoralमध्ये
सुचिकांतजी:
त्याकरता शुभेच्छा .. 💐
◾ सुचिकांतजी:
ताई, मेंदूचा विकास होणे म्हणजे नक्की काय ? तसेही आपण मोठे होतो तेव्हा आपल्यासोबत मेंदू वाढतच असतो ना?
श्रुती पानसे:
हो. प्रत्येक क्षणी बदल होत असतो.नवीन अनुभव येतील तसे विकास होत असतोच वेगवेगळ्या क्षेत्रात
सुचिकांतजी:
अच्छा . म्हणजे एखादं गाव - शहर नुसतच मोठं झालं आणि त्याचा विकास झाला या २ गोष्टी वेगळ्या तसच काहीसं.
श्रुती पानसे:
मेंदूमध्ये वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळी क्षेत्रं असतात. भाषेसाठी ब्रोका, आकलनासाठी वर्निक, स्मरणासाठी हिपोकॅम्पस इ.सतत त्यात नवी माहिती येत असते.
◾ सुचिकांतजी:
मल्टीपल Intelligence सारखं ?
श्रुती पानसे:
तो फारच सुंदर विषय आहे.शिक्षणात नवे बदल घडवण्याची ताकद आहे त्यात..
सुचिकांतजी:
खरंय .. मी पण त्याबाबत थोडं वाचलं आहे .. पण खूपच वेगळा आणि लोकांना माहिती नसलेला विषय आहे.
◾ मृणाल...मृण्मयी:
प्रक्रियाच तिथून होते म्हणूनच नं??
श्रुती पानसे:
अगदी बरोबर. यानुसार आपली बुध्दिमत्ता कळत जाते.
सुचिकांतजी:
हुशार आणि मठ्ठची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकणारा ..
श्रुती पानसे:
शिवाय दहावीला गुणपत्रिकेसोबत तुमची खरी बुध्दीमत्ताही समजेल
सुचिकांतजी:
हो ..
◾ सुचिकांतजी:
तुम्ही अंकुर सोबत काम करताय, त्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल..
श्रुती पानसे:
हे आम्हीच जन्माला घातलय.आम्ही मराठीतून शैक्ष. साधनं तयार केली आहेत. सापशिडी, जीवनसत्वं इ.
सुचिकांतजी:
अच्छा
श्रुती पानसे:
अंध मुलांसाठीही आहेत.
◾ सुचिकांतजी:
मुख्यत्त्वे तुम्ही कोणत्या शाळांसोबत काम करताय ?
श्रुती पानसे:
जि.प.मराठी शाळा.वंचित मुलांवर सर्व काम.
सुचिकांतजी:
मस्तच !!खरच .. तिथेच गरज आहे अशा कामाची ..
श्रुती पानसे:
पोतराज, पारधी मुलं एकदम मस्त असतात...उत्साही..शिकायला ऊत्सुक
असा आमचा अनुभव
सुचिकांतजी:
👍 खूप छान ... पुढचा प्रश्न घेतो .. मेंदूचा विकास फक्त जीन्सवर अवलंबून असतो का? उदा. आई-वडील-आजोबा आजी गणित विषयात खूप हुशार नाहीत, मग मुलाला गणितात प्राविण्य मिळू शकते का? अशी काही उदा. आहेत का?
श्रुती पानसे:
अर्थात एम. आय. नुसार प्रत्येकाचा स्वतंत्र सेट असतो.बुध्दिमत्तांचा या समूहातल्या सर्वांचा भाषिक आहे हे नक्की😀
सुचिकांतजी:
हा हा हा ..
श्रुती पानसे:
मुलांची बुध्दिमत्ता कुठे आहे हे ही कळतं.
◾ सुचिकांतजी:
म्हणजे हे केस बाय केस बदलू शकत बरोबर ?
श्रुती पानसे:
हो!!पारधी मुलं अफलातून चित्र काढतात...सख्खी भावंडंदेखील वेगळी असतात.
सुचिकांतजी:
खरंय .. अस अनेक ठिकाणी पाहिलं आहे ..
श्रुती पानसे:
मेंदू कसा शिकतो हे कळणं आणि त्यानुसार अभ्यास आखणं हेच ज्ञानरचनावादाचं मूळ.व्यक्ती तितक्या प्रकृती!!पहिल्या अनुभवामुळे मेंदूत सिनॅप्स तयार होतात.म्हणजे न्यूराॅन पेशींची जुळणी.यावर आधारित नूराॅन्सच्या अधिकाधिक शाखा फुटतात.एका रचनेवर दुसरी रचना.सोप्या भाषेत फांद्या फुटतात!!
मात्र सकस अनुभव हवेत.त्यात ताण नकोत
जबरदस्ती नको!!चांगले वाईट सर्व अनुभव महत्वाचे
सुचिकांतजी:
मी आजच वाचलं याबद्दल ...
◾ सुचिकांतजी:
अगदी थोडक्यात!! ज्ञानरचनावादाची व्याख्या काय कराल? म्हणजे अनुभवावर आधारित शिक्षण म्हणजे ज्ञानरचनावाद म्हणता येईल ना ?
श्रुती पानसे:
हो!!सर्व शिकवण्याचं काम करतात.वाईट अनुभवातून माणूस चुका करतोच.वाईट वागतो.मुलं अशीच तर शिकतात. टीव्ही खूप शिकवतो.
सुचिकांतजी:
हो .. पुढचा प्रश्न मृणाल विचारतील ..
◾ मृणाल...मृण्मयी: असं म्हटलं जातं, लहान बाळांचा, मुलांचा मेंदू, मोठ्या माणसांपेक्षा जलद प्रतिसाद देतो, हे खरं आहे का?
श्रुती पानसे:
हो.2 वर्षापर्यंत सिनॅप्सचा वेग जास्त असतो म्हणून.पुढे कमी होतो हा वेग
पण तरीही आपण आयुष्यभर शिकत राहतो
कोणत्याही वयात. काहीही😀
मृणाल...मृण्मयी:
अच्छा
सुचिकांतजी:
👏👏खूप रंजक आहे हे सर्व ..
◾ मृणाल...मृण्मयी:
यावर आधारित कळायला लागल्यापासून स्मार्ट फोन हाताळणार्या आणि इंटरनेट व सोशल नेटवर्किंगच्या आहारी जाणार्या मुलांच्या मेंदू आणि मानसिक विकासावर दुष्परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं का ?
असल्यास कोणते दुष्परिणाम होतील ? --------- अमेय गोखले
श्रुती पानसे:
मुलांना जे आवडतं ते तो पटकन शिकतो.हो!! नक्की होतील.डोळे, कान यावर होतील.पण माझ्या अंदाजानूसार याला स्मार्टनेस म्हणेल ही पिढी!!
मृणाल...मृण्मयी:
विविध खेळ, मुलांच्या मेंदूच्या जडणघडणीत कशी भूमिका बजावतात? यावर काही उदाहरणे देऊ शकाल का?
श्रुती पानसे:ही डिजिटल पिढी आहे
यांना जन्मापासून सवय आहे.आपल्यासारखं नाही
◾ मृणाल...मृण्मयी:
हल्लीच्या मुलांची बुद्धिमत्ता फार विकसित आहे(smart आहेत) शिवाय प्रत्येक पिढीच्या नंतर येणारी नवीन पिढी बुद्धीने दोन पाऊल पुढे असं म्हणतात ..त्या प्रमाणे का?
श्रुती पानसे:
हो!!आपले नियम यांना लावूच नयेत.काही बाबतीत
◾ सुचिकांतजी:
डॉ . अमेय यांनी अजून एक प्रश्न विचारला आहे .. खूपच वेगळा आहे...
१.मनाची व्याख्या कशी कराल ?
२. या दोन्ही गोष्टी एकच आहेत ?
समांतर आहेत ?
की खूपच भिन्न आहेत ?
३.भिन्न असल्यास त्याचा मेंदूहून वेगळेपणा काय आणि कसा सांगाल ?
◾ डॉ अमेय:
* दोन्ही गोष्टी = मन व मेंदू या दोन्ही गोष्टी
श्रुती पानसे:
मी वाचलंय त्यानुसार, मन म्हणजे भावना + कल्पना.म्हणजे lymbic system भावनांचं मेंदूतलं केंद्र त्यातला amygdala हा अवयव
सुचिकांतजी:
वा .. त्याकरता देखील वेगळा विभाग असतो ? मस्तच ..
श्रुती पानसे:
हो.हे सगळं खूप छान आहे.मेंदूत मन या विषयावर संशोधन चालू आहे.विचार प्रकियेवर देखील!!!
◾ मृणाल...मृण्मयी:
आपण हल्ली गर्भावर गर्भसंस्कार करण्याकरिता सीडी, युट्युबचा वापर करतो, याव्यतिरिक्त वाचन केलेल्या चांगल्या वाईट गर्भावर संस्कार होणाऱ्या या गोष्टी कितपत योग्य अयोग्य आहेत? - राहुल वेळापुरे
श्रुती पानसे:
मला वाटतं होत असणार.आई बाळाचं नातं म्हणजे जगातलं पहिलं प्रेम
आईचा आवाज बाळाला जवळून ऐकू येतो
साहचर्य असतं.आधार असतो.मानसिक सुरक्षितता नक्की मिळते बाकी कशाहीपेक्षा आईचा आवाज!!
मृणाल...मृण्मयी:
खरं आहे ...गर्भसंस्कार मध्ये आईने उलटी चित्रे काढण्याची एक संकल्पनां आहे ती शास्त्रीय आहे का?
◾ सुचिकांतजी:
ताई, एखाद्या मुलाची मातृभाषा कशी ठरवतात? आईची मातृभाषा की घरात बोलतात ती भाषा की परिसर भाषा? तुम्हाला काय वाटतं ?
श्रुती पानसे:
माझं मत वेगळं असू शकतं. पण आईची भाषा.कारण इतर कोणत्याही भाषेपेक्षा नऊ महिने याचा अनुभव जास्त मिळतो😊तीच घरातली आणि तिच परिसर भाषा असेल तर मग काहीच प्रश्न नाही.
◾ सुचिकांतजी:
गर्भावस्थेच्या कितव्या महिन्यात साधारणपणे मेंदू पूर्ण बनलेला असतो?....... वृषाली गोखले .
श्रुती पानसे:
मेंदू हळूहळू तयार होतो.आयुष्याच्या अंतापर्यंत मेंदू वाढतच असतो.शेवटच्या दिवशीही तो शिकू शकतो. नव्वदाव्या वर्षी ही!!
सुचिकांतजी:
पहिली 8 वर्षे मुलांशी संवाद करताना आणि त्यांना 'कोणत्याही' सूचना देताना,कमीत कमी किती वाक्ये असावीत व त्या वाक्यात कमीत कमी किती शब्द असावेत?.....- वृषाली गोखले
श्रुती पानसे:
नैसर्गिक बोलणं असावं.. कृत्रिम नसावं.भरपूर बोलावं!!त्यातून त्यांची शब्दसंपत्ती वाढते.Teenशी मात्र जरा कमीत कमी बोलावं.नाहीतर ते ऐकतच नाहीत पालकांचं!!संशोधनुसार हे सिध्दही झालय!!
सुचिकांतजी:
नवीन माहिती मिळते आहे ..
श्रुती पानसे:
त्यांना काही बोललं तरी उपदेश वाटतो.मग वादावादी अटळ ठरते.
सुचिकांतजी:
हो .. खरंय .. माझे दिवस आठवतो आहे मी .. 😂
श्रुती पानसे:
हल्ली या केसेस वाढल्या आहेत
सुयोगा ज्ञान:
🙄🙄😂😂😂
सुचिकांतजी:
अच्छा ..
श्रुती पानसे:
प्रत्येकानेच आठवावेत 😊हे दिवस
◾ सुचिकांतजी:
पुढचा प्रश्न घेतो .. मातृभाषेवर पुरेसे प्रभुत्व असल्याशिवाय मुलाला दुसरी भाषा शिकवू नये ही एक विचारसरणी तर मुले लहानपणीच अनेक भाषा एकाच वेळी शिकू शकतात आणि सहजपणे बोलू शकतात ही दुसरी विचारसरणी. या दोनपैकी कोणता विचार शास्त्रीयदृष्ट्या योग्य वाटतो?
......- काळपांडे सर
श्रुती पानसे:
मले वाटतं कितीही भाषा शिकू शकतो..फक्त त्यात जबरदस्ती अजिबात नसावी.सुरूवातीला जरा गोंधळ होतो.पण छान येतात भाषा.
सुचिकांतजी:
पण तसे वातावरण मिळाले तर, 👍मार्क, परीक्षा, यापेक्षा नुसत कसल्याही बंधनाशिवाय नैसर्गिकरीत्या शिकतात ..
श्रुती पानसे:
हो!!प्रत्येक भाषेसाठी न्यूराॅनचं स्वतंत्र जाळं असतं. मिश्र भाषेचंही जाळं स्वतंत्र असतं
सुचिकांतजी:
👍 मध्ये डॉ. विकास यांनी यावर लहान पोस्ट लिहिली होती ..
श्रुती पानसे:
हो. वाचलीहोती👌🏼
◾ सुचिकांतजी:
अजून एक..
लहान मुले वयाच्या साधारण 4 ते 5 वयापर्यंत भाषा बोलायला शिकतात.त्यांना ती कोणी शिकवत नाही.घरचे भाषिक संवाद साधतात तेव्हढंच.पण तेच मोठं झालं की एखादी भाषा विशेषत्वाने शिकावी लागते.(अमुक भाषा मी ऐकून ऐकून शिकलो अशी उदा फार कमी असतील बहुतेक)हि नक्की काय प्रक्रिया आहे?....स्वप्नील पाटील
श्रुती पानसे:
असे मेंदं जास्त विकसित असतात.पहिल्या वर्षात सिनॅप्सचा जास्त वेग हे एक कारण!!दुसरं म्हणजे नंतरच्या काळात केंद्रच बदलतं आकलनाचं!!अपरिचिताबद्दल भीती हे ही एक कारण!!बिनधास्त चुका करतात म्हणून लवकर शिकतात!!
◾ मृणाल...मृण्मयी:
म्हणूनच का परकीय भाषा शिकताना मुलाचा मेंदू ती भाषा स्वतःकडे येण्या आधी न्यूरॉन त्याची चाळण करतो ??
श्रुती पानसे:
हो. बरोबर😀
◾ मृणाल...मृण्मयी:
म्हणजे नेमके कसे??
श्रुती पानसे:
फक्त नवी भाषा शिकतानाच नाही.नवी जागा, नवं वातावरण, नवी माणसं
प्रत्येक वेळेला भयंकर सावध
मृणाल...मृण्मयी:
अच्छा..असेही आहे का?
श्रुती पानसे:
कारण ही मानवाची आदिम सवय आहे.झाडं, प्राणी, नव्या गुहा शोधताना सदैव सावध असावं लागायचं स्वत:ची काळजी घेतो आपण.
◾ मृणाल...मृण्मयी:
चाळण म्हणजे या अर्थाने का?
श्रुती पानसे:
हो!!ज्याचा पूर्वानुभव नाही ते सर्व
मृणाल...मृण्मयी:
किती बोलकी क्रिया होत असेल नाही मेंदूत😀
श्रुती पानसे:
एकदा ओळखीचं झालं की भीती आपोआप जाते.👌🏼👌🏼खूप मस्त..न्यूराॅन्स जुळावे लागतात प्रत्येक वेळेला!!
मृणाल...मृण्मयी:
आणि या क्रिया निमिषात घडत असतील नाही!!!
श्रुती पानसे:
हो. कळतही नाही आपल्याला.
◾ मृणाल...मृण्मयी: आता थोडं मुलांकडे आणि शाळेकडे वळूया
श्रुतीताई,
मेंदू आणि शिक्षण हा विषय सर्व शिक्षकांना उपयुक्त आहे. खास करून प्राथमिक शाळांमध्ये. पण या विषयी शिक्षकांना जाणीव आहे असं फार कमी. त्यासाठी आपण (तुम्ही आणि आम्ही) काय करू शकतो? एखादा लहान कालावधीचा अभ्यासक्रम आहे का त्यासाठी? - सुयोगा जठार
श्रुती पानसे:
आपलं रडणं, हसणं, एखाद्याशी विशेष मैत्री तर एखादा न आवडणं हे सर्व काही रसायनांवर अवलंबून असतं.शिक्षक प्रशिक्षण सतत चालू असतंआम्ही त्यासाठी शाळांमध्ये जातो
सुचिकांतजी:
छानच ..
◾ सुचिकांतजी:
पानसें ताई,
आपला परिचय वाचल्यावर काही विचारावे वाटले.. ते... पाळणाघर ते शालांत पर्यंत च्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांना उपयुक्त अशा मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, मेंदू रचना असा आपला व्यापक अभ्यास आहे. यांतील आपल्या आवडीचा विषय कोणता? त्यातील परस्पर संबंधाबद्दल आपण काही सांगू शकाल? - खाडीलकर काका
श्रुती पानसे:
सगळ्याचा मध्यवर्ती विषय एकच - मेंदू.....मेंदूचा विकास वयानुसार!!परिस्थिती आणि वातावरणानुसार बदल होत जातो. तो दरवेळी अभ्यासायचा. हे काम आवडतं!!
◾ सुचिकांतजी:
9 वी 10 वी चे अभ्यासक्रमात व्यक्तीमत्वाचे पैलू आणि विकासाच्या प्रकारात आत्मिक विकास हा नव्याने उपनिषय आला आहे. तो शिकवायला अवघड जातो, त्या बद्दल शिक्षकांचे दृष्टीने काही सांगावे. अनेक शाळांनी या विषयाचे महत्व न ओळखल्याने या विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. याबद्दल आपणास काय वाटते? - खाडीलकर काका
श्रुती पानसे:
सगळ्याचा एकमेकांशी संबंध आहेच..सदसदविवेक बुध्दीला आवाहन लहान मुलांनाही करता येतं.तो आधार मी घेतलाय..शिक्षकांना तर हे खूप छान पध्दतीने करता येतं.कारण त्यांच्यासमोर सतत जिवंत ऊदा. असतात.आत्मा म्हटलं की संकल्पना लांब जाते.पण साध्यासुध्या चांगल्या वागण्यातून आत्मिक विकास होत असतो.
सुचिकांतजी:
👍
◾ मृणाल...मृण्मयी:
लहान मुलांच्या डोक्यात काय घडामोडी चालतात व कोणत्या त्या त्यांच्या वागणुकीतून ओळखता येतात का,आवडी आपण कश्या ओळखाव्यात....अजित राणे
श्रुती पानसे:
😀👌🏼आपण प्रौढांच्या चष्म्यातून पाहिलं तर चुकाच चुका दिसतात त्यांच्या वयाचं होता आलं पाहिजे.तर सगळ काही समजेल.त्यांचं वागणं अतिशय स्वच्छ असतं
रोहिणी बागल:
अगदी खरं✅✅
◾ सुचिकांतजी:
अनेक वेळा शिक्षक किंवा पालक, मुलांना शांत राहा, अमुक करू नका, तमुक करू नका, अशा सूचना देतात, पण तरीही लहान मुलं ऐकत नाहीत, यावर तुमचे निरीक्षण काय सांगते? लहान मुलांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण नसते का?
अमोल शिंपी: छान प्रश्न. माझ्या मनातला.
श्रुती पानसे: काॅर्पस कलोझम या नावाचा एक अवयव असतो तो जोपर्यंत विकसित होत असतो, तोपर्यंत मुलं भरपूर हालचाली करत असतात.साधारण आठ वर्षापर्यत.ती हालचाल त्यांनी करायलाच हवी
◾ सुचिकांतजी:
म्हणजे चंचल असतात असं म्हणायचं आहे का ?
श्रुती पानसे:
हो. मोठ्यांच्या भाषेत😀
हा अवयव आपल्याला मरेपर्यंत साथ देतो.
सुचिकांतजी:
म्हणजे आपल्याला जरी वर्गात बसवले तरी आपण असच करू होना ?
श्रुती पानसे:
हो!!जर त्याअंनी हालचाल केली नाही तर समस्या येतील.9- 1 0 वयानंतर कमी कमी होते हालचाल!!आपण बसू शकतो आठ आठ तास . बालवाडीतली मुलं मुळीच नाही.
◾ सुचिकांतजी:
तुम्ही हसू नका माझ्या मनात एक वेगळा प्रश्न आहे ... धीर करून विचारतो ..
श्रुती पानसे:
हं... 😀 काय?
◾ सुचिकांतजी:
अंगात येणे हा प्रकार आपण नेहमी मोठ्या माणसांच्या बाबतीत बघतो, लहान मुलांच्या बाबतीत नाही... यात मेंदूची काही विशिष्ट भूमिका असते का?
श्रुती पानसे:
मस्त!!मुलं कायमच मोठ्यांचं लक्ष वेधून घ्यायच्या उद्योगात असतात. मोठ्यांना हे मुद्दाम करावं लागतं😀लहान मुलं स्वच्छ असतात.सरळ सरळ हट्ट करून मोकळी होतात😀
सुचिकांतजी:
खरं आहे ..
वृषाली ताई:
नैसर्गिक हक्क बजावतात!
श्रुती पानसे:
अगदी!!मोठ्यांचं जगच वेगळं
सुचिकांतजी:
आता मुलाखतीची सूत्र मृणालकडे देतो ....
◾ मृणाल...मृण्मयी:
पालक म्हणून मुलांच्या अभ्यासात इंटरनेटचा वापर कितपत योग्य आहे?
एखादया प्रश्नाचं उत्तर देताना आपण आंतरजालावर विसंबून राहणं कितपत योग्य वाटतं?....राहुल वेळापुरे
श्रुती पानसे:
खरतर नकोय. त्यापेक्षा प्रत्यक्ष भेट हवी. पुस्तकंही चालतील.पण काळाप्रमाणे बदलायला हवं.मागे राहून चालणार नाही या पिढीला
निवेदिता ताई:
कित्ती perfect निरीक्षण व चपखल कारण!.
मृणाल...मृण्मयी:
मग सुवर्णमध्य कसा साधावा?
श्रुती पानसे:
हाच आहे ज्ञानरचनावाद!!शाळा आणि पालकांनी ठरवल्यास!!पण मुलं सोप्याकडे जाणारच. नाही का?
मृणाल...मृण्मयी:
अच्छा!!!मस्त
◾ मृणाल...मृण्मयी:
ताई,माझे प्रश्न थोडे मुलांच्या भावविश्वकडे जाणारे आहेत..विचारू??थोडी लांबेल
श्रुती पानसे:
हो
◾ मृणाल...मृण्मयी:
भांडणातून आणि निराशेतुन गुंतागुंत होणाऱ्या मुलांना तुम्ही कसे हाताळता??
श्रुती पानसे:
त्यांना आधी शांत करायला हवं.
सहा सात वर्षांच्या मुलांचा आत्मविश्वासही खचतो.आधार मिळाला. विश्वास वाटला तर खुलतात मुलं ..असा अनुभव आहे
मृणाल...मृण्मयी:
भावनिक आधार!!
श्रुती पानसे:
सर्वात महत्वाचा!!अनेकदा अभ्यासात अडचण म्हणून येतात.पण अडचण तिथे नसतेच ब-याचदा मनात असते!!
◾ मृणाल...मृण्मयी:
मग असं म्हणावं का??"......मुलांना त्यांच्या पालकांपासून आधी वाचवा" मुलांवर काम करणे गरजेचे कि पालकांवर??
श्रुती पानसे:
खरय % पालकांवर
◾ मृणाल...मृण्मयी:
अतिअपेक्षा करणारे आणि अतिउपेक्षा करणारे पालक आम्हा पालकांना काय सांगाल यावर तुम्ही...थोडं आमचं समुपदेशन करा🙏
श्रुती पानसे:
अरे, त्यपेक्षा आपसात भांडणारे पालक सर्वात वाईट.
◾ सुचिकांतजी:
हा प्रश्न घ्या .. म्हटलो होतो मृणालना अगोदरच 😄
श्रुती पानसे:
घर शांत ठेवणं सर्वात आवश्यक.
सुचिकांतजी:
भांडकुदळ पालक!!
श्रुती पानसे:
मुलं खूप भांबावतात.गोंधळतात
..हिरमुसतात.परिणामी अस्वस्थ होतात.
मन, शरीर सगळ्यावर वाईट परिणाम होतो.गंमत म्हणजे मुलांनाच दोष देतात.खूपदा!!अपेक्षा, स्पर्धा आहेच असं म्हणतात. पण आपण दूर राहू शकतोच की सगळ्यापासून!!मुलांना समजून घेऊन पाठीशी उभं राहणं इतकी साधी गोष्ट केली तर रस्सीखेच संपेल.
◾ मृणाल...मृण्मयी:
मेंदूचा चांगला विकास होण्यासाठी चांगला आहार घेणे हे गरजेचं आहे पण काही वेळेला आपण बघतो कि गरीब घरचे मुले जे अगदी हातावर कमवून शिक्षण घेतात, त्यांना सकस आहार भेटत नसूनही काही वेळेस अशा घरची मुले देखील शिक्षणात पुढे असतात आणि उच्च पदावर पोहचतात.. ह्या मागे काय कारण आहे..?
........किरण बोडके
श्रुती पानसे:
त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त असते. पण त्या सगळ्या मुलांना सकस आहार मिळाला तर वाट सोपी होईल त्यांची.
मृणाल...मृण्मयी:
अच्छा!!
श्रुती पानसे:
पोषक आहार दिल्याने केवढा फरक पडलाय..एकाग्रता, स्मरणशक्ती यासाठी लोह प्रथिनं हव ते मिळायला हवं.
◾ मृणाल...मृण्मयी:
लहान मुलं जेव्हा मोठ्यांसमोर सफाईदारपणे मोबाईल वापरतात तेव्हा आपण म्हणतो "आजची पिढी हुशार आहे"
परंतु काही पाल्यांच्या बाबतीत त्यांचे हुशार वागणे त्यांच्या शिक्षणात साथ देत नाही..
त्यांचा हा मोबाईलचा / तंत्रज्ञानाकडे असलेला ओढा शिक्षणाकडे, वाचनाकडे त्याच ऊर्जेने कसा वळवता येईल?
......- राहुल वेळापुरे
श्रुती पानसे:
अतिशय अवघड आहे. कारण अवघ्या वातावरण भारलंय मोबाईलमुळे
वृषाली ताई:
राहुल प्रश्न ज्वलंत आहे...
श्रुती पानसे:
मुलं दूर कशी राहू शकतील?
म्हणून तर इ लर्निंग.तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश आपणच केलाय..मुलं यातूनच तर शिकताहेत.चक्र मागे फिरवत येईल?
सुचिकांतजी:
बरोबर .आता काळाप्रमाणे पुढे जायला हवं सर्वच क्षेत्रात ..
◾ मृणाल...मृण्मयी:
रमेश पानसें च्या म्हणण्याप्रमाणे मानसशास्त्राच्या पुढे आकलन शास्त्र आले आहे. ज्या मधे मेंदू मधील ज्ञान ग्रहणावेळच्या प्रक्रीयांचा विचार केला जातो.
पण अजूनही मला वाटते यात मानसोपचार तज्ञ डाॅक्टर्स व मानसशास्त्राचे डाॅक्टर नसलेले अभ्यासक यामधे एकवाक्यता व समन्वय नाही.
तो येण्यासाठी काय करावे असे आपणास वाटते ?
-- प्रभाकर खाडिलकर
श्रुती पानसे:
एकत्र सेमिनार्स घडवून आणायला हवेत असं वाटतः
◾ मृणाल...मृण्मयी:
भारतात 2020 पर्यंत 20% लोकसंख्या मानसिक रुग्ण असण्याची शक्यता आहे.
2001 मध्ये जगाच्या लोकसंख्येच्या 10% इतका मानसिक रुग्णतेचा असणारा दर 2010 पर्यंत 15% वर जाण्याची भीती व्यक्त केली गेली होती.
विविध संस्थांच्या अवहालांनुसार भारतातील 6.7% लोकसंख्या मानसिक रुग्णतेने आजारी आहेत.पैकी 12% हि 6-14 वयोगातील मुलं आहेत.त्या तुलनेत देशात यावर वैद्यकीय सुविधा,दवाखाने आणि समुपदेशन केंद्रे व तज्ञ व्यक्ती यांची कमतरता आहे.या लहान वयोगटासाठी तुमची नेमकी कार्यशैली काय आहे?पुढच्या येणाऱ्या आव्हानास आपण कस सामोरं जाता.....
श्रुती पानसे:
माझ्या कामाचा रोख पालक आणि शिक्षकांवर आहे. ते सुधारलं तर बाकी गोष्टींची गरज पडूच नये
◾ मृणाल...मृण्मयी:
मला dr श्रुती पानसे याना फकत एवढेच विचारायचे आहे की अक्षरनंदन चा अनुभव पालक म्हणून कसा आहे ?? - संध्या भोसले
श्रुती पानसे:
अतिशय चांगला. अपेक्षेपेक्षा चांगला 👍🏼
सुचिकांतजी:
ताई आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखतीसाठी आलात त्याकरता धन्यवाद ..
श्रुती पानसे:
मीच धन्यवाद द्यायला हवेत.मेंदू तल्लख झाला माझा😀
काळपांडे काका:
अतिशय उत्स्फूर्त झाली मुलाखत.
'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे डॉ. श्रुती पानसे यांनी शिक्षणाबद्दल जो अभ्यास केला आहे, त्यांना जे वाटते ते अगदी सहजपणे त्या आपल्यापर्यंत पोचवत होत्या.
अमोल शिंपी:
श्रृतीताईं आपला 'मेंदू आणि शिक्षण' या विषयावरचा पीचडीसाठीचा शोध प्रबंध पीडीएफ स्वरुपात आहे का? तो आम्हाला वाचायला मिळू शकेल का?
त्यात निश्चितच विस्तृत माहिती असेल मेंदूच्या विविध केंद्रांची व घडामोडींची.
उत्सुकता वाढीस लागलीय.
आपल्या मुलाखतीत आपण मेंदूबद्दल इतकी माहीती दिलीय तर शोध प्रबंधात किती असेल?
श्रुती पानसे:
http:///shodhganga.inflibnet.ac.in या वेबसाईटवर प्रबंध आहे माझा.
अजित राणे:
डॉ. श्रुती पानसे यांची मुलाखत खूप छान झाली
आम्हा पालकांना खूप काही शिकायला मिळालं, आमच्या चुका सुद्धा आम्हला कळून आल्या..
धन्यवाद ताई..
सुचिकांतजी:
आज आपण डॉ. श्रुती पानसे यांच्याशी बोललो. मेंदू आणि शिक्षणविषयक अनेक पैलू आपल्यासमोर आले. श्रुती ताईंनी न थकता जवळ जवळ अडीच तासाहून जास्त वेळ आपल्या सर्वांना दिला, त्याबद्दल समूहातर्फे त्यांचे खूप खूप आभार...
॥ज्ञानभाषा मराठी॥
॥माझी शाळा📚माझी भाषा॥☺
निसर्ग म्हणजे रंग तयार करणारा अनोखा रंगकर्मी!! त्याच्या रंगनिर्मितीला तोड नाही.सूर्य उगवताच आनंदाने उधळलेला नारिंगी-पिवळसर रंग,अस्ताला जाताना विरहाने उमटलेला लालसर-नारिंगी रंग,गर्द सावलीच्या शांततेला मिळालेला काळसर-पांढरा रंग,हिरव्या हिरवळीतील चैतन्याला दिलेला हिरवा-पोपटी रंग,मृदेच्या पालन क्षमतेतील काळसर-तांबडा रंग आणि त्यातून उमलणाऱ्या रोपट्यातील पोषणाचा मात्र हिरवाच रंग!!!अशा अनेकानेक रंगांच्या या रंगकर्मी पुढे सदैव नतमस्तक व्हावे!!!
🌹आजचा रंग: गहन निळा
शांती निदर्शक असा निळा रंग! शीतलता आणि स्निग्धता ही या रंगाची वैशिष्ट्ये आहेत. समुद्र आणि अवकाशाचा अमर्याद विस्तीर्ण पसारा सामावून घेणारा हा रंग विश्वासाचं, श्रध्येचं, सुस्वभावाचं, आत्मीयतेचं प्रतिक आहे!! निळा रंग सुस्वभावी देवी नारायणीशी संबंधित आहे!!!
🌹 या रंगाचे वैशिष्ट्य घेऊन येणारी आजची पाचवी माळ गुंफुया!!
⚡ पाचवी माळ स्त्री-सामर्थ्याची⚡
⚡ डॉ.श्रुती पानसे⚡
🌹 परिचय:
🌹
डॉक्टरेट- मेंदू व शिक्षण
◾अंकुर माध्यम तर्फे शाळा,कॉलेज मध्ये मुलांच्या मेंदूत डोकवूया यावर कार्यशाळा.
◾सामाजिक-शैक्षणिक संशोधन प्रकल्पात सहभाग.
◾विशेष व सामान्य मुलांसाठी शैक्षणिक साहित्यनिर्मिती
◾शैक्षणिक संस्थांचे डॉक्युमेन्टेशन
◾दैनिक सकाळ,दैनिक लोकसत्ता,दैनिक लोकमत मध्ये लेखमाला प्रकाशित
◾टी.व्ही आणि आकाशवाणीवर शिक्षणविषयक चर्चांमध्ये सहभाग
🌹 प्रकाशित पुस्तके
१. पाळणाघर असं असावं
२.अशी का वागतात मुलं
३.अभ्यास आनंददायी कसा कराल?
४. मुलांचे ताण जबाबदारी पालकांची
५. आधुनिक स्फूर्तिकथा
६.दफ्तराचे ओझे
७.गृहपाठ
८.शिक्षा
९.डेअर टू ड्रीम्स
१०.उत्तरांच्या वाटेवर
११.व्यक्तिमत्त्व विकास..इयत्ता-९वी
१२.व्यक्तिमत्त्व विकास..इयत्ता-१०वी
१३.डोक्यात डोकवा
१४. बहुरंगी बुद्धिमत्ता
१५.पहिली आठ वर्षे
१६. टीन एजर्सच्या मनात
॥ज्ञानभाषा मराठी॥
॥माझी शाळा📚माझी भाषा॥
◾ सुचिकांतजी:
सर्वांना नमस्कार,
मी सुचिकांत, || ज्ञानभाषा मराठी || समूहाच्या #माळ_स्त्रीसामर्थ्याची या उपक्रमांतर्गत आयोजित मुलाखतीत डॉ. श्रुती पानसे यांचे स्वागत करतो. 💐
श्रुती पानसे:
👍🏼😀
◾ सुचिकांतजी:
ताई, मानवाचा मेंदू सर्वात जास्त सामर्थ्यशाली अवयव आहे. तुम्ही PHD साठी मेंदू आणि शिक्षण हा विषय घेतलात त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम अभिनंदन!
श्रुती पानसे:
महत्वाचाच आहे हा विषय
◾ सुचिकांतजी:
हो .. खूपच ..
तुम्हाला हाच विषय अभ्यासावा असं का वाटलं त्यावेळी ?इतर कोणते पर्याय होते तुमच्यासमोर ?
श्रुती पानसे:
खरतर मी एम. ए. मराठी आहे.
सुचिकांतजी:
अरे वा ..
श्रुती पानसे:
पण शिक्षण महत्वाचा विषय वाटला.
सुचिकांतजी:
अच्छा ..
श्रुती पानसे:
पुण्यात मनपा शाळातल्या पहिलीच्या मुलींवर पीएचडीचा अभ्यास. कारण त्यांच्या पालकांची अजूनही शिक्षणाची पार्श्वभूमी नसते. आधुनिक मेंदूसंशोधन ही नवीन तंत्रज्ञान एफ एम आर आय ची देन आहे. याचा शास्त्रीय अभ्यास पाश्चात्य देशांमध्ये झालेला आहे.
याचा भारतीय संदर्भात अभ्यास करावासा वाटला. त्यातही आर्थिक वंचित घटकावर. म्हणून हा विषय निवडला.
सुचिकांतजी:
मस्तच ...
श्रुती पानसे:
अभ्यास करताना वेगळे अनुभव आले.सरकारी शाळाही अभ्यासता आल्या.
मला असं जाणवलं की मुलं सगळीकडे सारखीच असतात. फरक पडतो ते त्यांना कसे अनुभव मिळाले आहेत आणि सकस आहार मिळालाय की नाही यावर.
◾ सुचिकांतजी:
यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिके असतीलच ना ? मग कधी मेंदूचे डॉक्टर झाल्याचा अनुभव आला का ? डॉक्टरांकडून काही न मिळाले का ?
श्रुती पानसे:
नाही.
सुचिकांतजी:
अच्छा ..
श्रुती पानसे:
अगदी उलट अनुभव.
सुचिकांतजी:
उदा.
श्रुती पानसे:
उपलब्ध मशीनरी बघू दिली नाही
सुचिकांतजी:
ओह ..
सुचिकांतजी:
पण ती गरजेची असेल ना!!
श्रुती पानसे:
हा अभ्यास नेट वर केला मग!!मूलभूत नाही झालं संशोधन!!Appliedझालं.पण करण्याची इच्छा आहे.Post doctoralमध्ये
सुचिकांतजी:
त्याकरता शुभेच्छा .. 💐
◾ सुचिकांतजी:
ताई, मेंदूचा विकास होणे म्हणजे नक्की काय ? तसेही आपण मोठे होतो तेव्हा आपल्यासोबत मेंदू वाढतच असतो ना?
श्रुती पानसे:
हो. प्रत्येक क्षणी बदल होत असतो.नवीन अनुभव येतील तसे विकास होत असतोच वेगवेगळ्या क्षेत्रात
सुचिकांतजी:
अच्छा . म्हणजे एखादं गाव - शहर नुसतच मोठं झालं आणि त्याचा विकास झाला या २ गोष्टी वेगळ्या तसच काहीसं.
श्रुती पानसे:
मेंदूमध्ये वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळी क्षेत्रं असतात. भाषेसाठी ब्रोका, आकलनासाठी वर्निक, स्मरणासाठी हिपोकॅम्पस इ.सतत त्यात नवी माहिती येत असते.
◾ सुचिकांतजी:
मल्टीपल Intelligence सारखं ?
श्रुती पानसे:
तो फारच सुंदर विषय आहे.शिक्षणात नवे बदल घडवण्याची ताकद आहे त्यात..
सुचिकांतजी:
खरंय .. मी पण त्याबाबत थोडं वाचलं आहे .. पण खूपच वेगळा आणि लोकांना माहिती नसलेला विषय आहे.
◾ मृणाल...मृण्मयी:
प्रक्रियाच तिथून होते म्हणूनच नं??
श्रुती पानसे:
अगदी बरोबर. यानुसार आपली बुध्दिमत्ता कळत जाते.
सुचिकांतजी:
हुशार आणि मठ्ठची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकणारा ..
श्रुती पानसे:
शिवाय दहावीला गुणपत्रिकेसोबत तुमची खरी बुध्दीमत्ताही समजेल
सुचिकांतजी:
हो ..
◾ सुचिकांतजी:
तुम्ही अंकुर सोबत काम करताय, त्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल..
श्रुती पानसे:
हे आम्हीच जन्माला घातलय.आम्ही मराठीतून शैक्ष. साधनं तयार केली आहेत. सापशिडी, जीवनसत्वं इ.
सुचिकांतजी:
अच्छा
श्रुती पानसे:
अंध मुलांसाठीही आहेत.
◾ सुचिकांतजी:
मुख्यत्त्वे तुम्ही कोणत्या शाळांसोबत काम करताय ?
श्रुती पानसे:
जि.प.मराठी शाळा.वंचित मुलांवर सर्व काम.
सुचिकांतजी:
मस्तच !!खरच .. तिथेच गरज आहे अशा कामाची ..
श्रुती पानसे:
पोतराज, पारधी मुलं एकदम मस्त असतात...उत्साही..शिकायला ऊत्सुक
असा आमचा अनुभव
सुचिकांतजी:
👍 खूप छान ... पुढचा प्रश्न घेतो .. मेंदूचा विकास फक्त जीन्सवर अवलंबून असतो का? उदा. आई-वडील-आजोबा आजी गणित विषयात खूप हुशार नाहीत, मग मुलाला गणितात प्राविण्य मिळू शकते का? अशी काही उदा. आहेत का?
श्रुती पानसे:
अर्थात एम. आय. नुसार प्रत्येकाचा स्वतंत्र सेट असतो.बुध्दिमत्तांचा या समूहातल्या सर्वांचा भाषिक आहे हे नक्की😀
सुचिकांतजी:
हा हा हा ..
श्रुती पानसे:
मुलांची बुध्दिमत्ता कुठे आहे हे ही कळतं.
◾ सुचिकांतजी:
म्हणजे हे केस बाय केस बदलू शकत बरोबर ?
श्रुती पानसे:
हो!!पारधी मुलं अफलातून चित्र काढतात...सख्खी भावंडंदेखील वेगळी असतात.
सुचिकांतजी:
खरंय .. अस अनेक ठिकाणी पाहिलं आहे ..
श्रुती पानसे:
मेंदू कसा शिकतो हे कळणं आणि त्यानुसार अभ्यास आखणं हेच ज्ञानरचनावादाचं मूळ.व्यक्ती तितक्या प्रकृती!!पहिल्या अनुभवामुळे मेंदूत सिनॅप्स तयार होतात.म्हणजे न्यूराॅन पेशींची जुळणी.यावर आधारित नूराॅन्सच्या अधिकाधिक शाखा फुटतात.एका रचनेवर दुसरी रचना.सोप्या भाषेत फांद्या फुटतात!!
मात्र सकस अनुभव हवेत.त्यात ताण नकोत
जबरदस्ती नको!!चांगले वाईट सर्व अनुभव महत्वाचे
सुचिकांतजी:
मी आजच वाचलं याबद्दल ...
◾ सुचिकांतजी:
अगदी थोडक्यात!! ज्ञानरचनावादाची व्याख्या काय कराल? म्हणजे अनुभवावर आधारित शिक्षण म्हणजे ज्ञानरचनावाद म्हणता येईल ना ?
श्रुती पानसे:
हो!!सर्व शिकवण्याचं काम करतात.वाईट अनुभवातून माणूस चुका करतोच.वाईट वागतो.मुलं अशीच तर शिकतात. टीव्ही खूप शिकवतो.
सुचिकांतजी:
हो .. पुढचा प्रश्न मृणाल विचारतील ..
◾ मृणाल...मृण्मयी: असं म्हटलं जातं, लहान बाळांचा, मुलांचा मेंदू, मोठ्या माणसांपेक्षा जलद प्रतिसाद देतो, हे खरं आहे का?
श्रुती पानसे:
हो.2 वर्षापर्यंत सिनॅप्सचा वेग जास्त असतो म्हणून.पुढे कमी होतो हा वेग
पण तरीही आपण आयुष्यभर शिकत राहतो
कोणत्याही वयात. काहीही😀
मृणाल...मृण्मयी:
अच्छा
सुचिकांतजी:
👏👏खूप रंजक आहे हे सर्व ..
◾ मृणाल...मृण्मयी:
यावर आधारित कळायला लागल्यापासून स्मार्ट फोन हाताळणार्या आणि इंटरनेट व सोशल नेटवर्किंगच्या आहारी जाणार्या मुलांच्या मेंदू आणि मानसिक विकासावर दुष्परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं का ?
असल्यास कोणते दुष्परिणाम होतील ? --------- अमेय गोखले
श्रुती पानसे:
मुलांना जे आवडतं ते तो पटकन शिकतो.हो!! नक्की होतील.डोळे, कान यावर होतील.पण माझ्या अंदाजानूसार याला स्मार्टनेस म्हणेल ही पिढी!!
मृणाल...मृण्मयी:
विविध खेळ, मुलांच्या मेंदूच्या जडणघडणीत कशी भूमिका बजावतात? यावर काही उदाहरणे देऊ शकाल का?
श्रुती पानसे:ही डिजिटल पिढी आहे
यांना जन्मापासून सवय आहे.आपल्यासारखं नाही
◾ मृणाल...मृण्मयी:
हल्लीच्या मुलांची बुद्धिमत्ता फार विकसित आहे(smart आहेत) शिवाय प्रत्येक पिढीच्या नंतर येणारी नवीन पिढी बुद्धीने दोन पाऊल पुढे असं म्हणतात ..त्या प्रमाणे का?
श्रुती पानसे:
हो!!आपले नियम यांना लावूच नयेत.काही बाबतीत
◾ सुचिकांतजी:
डॉ . अमेय यांनी अजून एक प्रश्न विचारला आहे .. खूपच वेगळा आहे...
१.मनाची व्याख्या कशी कराल ?
२. या दोन्ही गोष्टी एकच आहेत ?
समांतर आहेत ?
की खूपच भिन्न आहेत ?
३.भिन्न असल्यास त्याचा मेंदूहून वेगळेपणा काय आणि कसा सांगाल ?
◾ डॉ अमेय:
* दोन्ही गोष्टी = मन व मेंदू या दोन्ही गोष्टी
श्रुती पानसे:
मी वाचलंय त्यानुसार, मन म्हणजे भावना + कल्पना.म्हणजे lymbic system भावनांचं मेंदूतलं केंद्र त्यातला amygdala हा अवयव
सुचिकांतजी:
वा .. त्याकरता देखील वेगळा विभाग असतो ? मस्तच ..
श्रुती पानसे:
हो.हे सगळं खूप छान आहे.मेंदूत मन या विषयावर संशोधन चालू आहे.विचार प्रकियेवर देखील!!!
◾ मृणाल...मृण्मयी:
आपण हल्ली गर्भावर गर्भसंस्कार करण्याकरिता सीडी, युट्युबचा वापर करतो, याव्यतिरिक्त वाचन केलेल्या चांगल्या वाईट गर्भावर संस्कार होणाऱ्या या गोष्टी कितपत योग्य अयोग्य आहेत? - राहुल वेळापुरे
श्रुती पानसे:
मला वाटतं होत असणार.आई बाळाचं नातं म्हणजे जगातलं पहिलं प्रेम
आईचा आवाज बाळाला जवळून ऐकू येतो
साहचर्य असतं.आधार असतो.मानसिक सुरक्षितता नक्की मिळते बाकी कशाहीपेक्षा आईचा आवाज!!
मृणाल...मृण्मयी:
खरं आहे ...गर्भसंस्कार मध्ये आईने उलटी चित्रे काढण्याची एक संकल्पनां आहे ती शास्त्रीय आहे का?
◾ सुचिकांतजी:
ताई, एखाद्या मुलाची मातृभाषा कशी ठरवतात? आईची मातृभाषा की घरात बोलतात ती भाषा की परिसर भाषा? तुम्हाला काय वाटतं ?
श्रुती पानसे:
माझं मत वेगळं असू शकतं. पण आईची भाषा.कारण इतर कोणत्याही भाषेपेक्षा नऊ महिने याचा अनुभव जास्त मिळतो😊तीच घरातली आणि तिच परिसर भाषा असेल तर मग काहीच प्रश्न नाही.
◾ सुचिकांतजी:
गर्भावस्थेच्या कितव्या महिन्यात साधारणपणे मेंदू पूर्ण बनलेला असतो?....... वृषाली गोखले .
श्रुती पानसे:
मेंदू हळूहळू तयार होतो.आयुष्याच्या अंतापर्यंत मेंदू वाढतच असतो.शेवटच्या दिवशीही तो शिकू शकतो. नव्वदाव्या वर्षी ही!!
सुचिकांतजी:
पहिली 8 वर्षे मुलांशी संवाद करताना आणि त्यांना 'कोणत्याही' सूचना देताना,कमीत कमी किती वाक्ये असावीत व त्या वाक्यात कमीत कमी किती शब्द असावेत?.....- वृषाली गोखले
श्रुती पानसे:
नैसर्गिक बोलणं असावं.. कृत्रिम नसावं.भरपूर बोलावं!!त्यातून त्यांची शब्दसंपत्ती वाढते.Teenशी मात्र जरा कमीत कमी बोलावं.नाहीतर ते ऐकतच नाहीत पालकांचं!!संशोधनुसार हे सिध्दही झालय!!
सुचिकांतजी:
नवीन माहिती मिळते आहे ..
श्रुती पानसे:
त्यांना काही बोललं तरी उपदेश वाटतो.मग वादावादी अटळ ठरते.
सुचिकांतजी:
हो .. खरंय .. माझे दिवस आठवतो आहे मी .. 😂
श्रुती पानसे:
हल्ली या केसेस वाढल्या आहेत
सुयोगा ज्ञान:
🙄🙄😂😂😂
सुचिकांतजी:
अच्छा ..
श्रुती पानसे:
प्रत्येकानेच आठवावेत 😊हे दिवस
◾ सुचिकांतजी:
पुढचा प्रश्न घेतो .. मातृभाषेवर पुरेसे प्रभुत्व असल्याशिवाय मुलाला दुसरी भाषा शिकवू नये ही एक विचारसरणी तर मुले लहानपणीच अनेक भाषा एकाच वेळी शिकू शकतात आणि सहजपणे बोलू शकतात ही दुसरी विचारसरणी. या दोनपैकी कोणता विचार शास्त्रीयदृष्ट्या योग्य वाटतो?
......- काळपांडे सर
श्रुती पानसे:
मले वाटतं कितीही भाषा शिकू शकतो..फक्त त्यात जबरदस्ती अजिबात नसावी.सुरूवातीला जरा गोंधळ होतो.पण छान येतात भाषा.
सुचिकांतजी:
पण तसे वातावरण मिळाले तर, 👍मार्क, परीक्षा, यापेक्षा नुसत कसल्याही बंधनाशिवाय नैसर्गिकरीत्या शिकतात ..
श्रुती पानसे:
हो!!प्रत्येक भाषेसाठी न्यूराॅनचं स्वतंत्र जाळं असतं. मिश्र भाषेचंही जाळं स्वतंत्र असतं
सुचिकांतजी:
👍 मध्ये डॉ. विकास यांनी यावर लहान पोस्ट लिहिली होती ..
श्रुती पानसे:
हो. वाचलीहोती👌🏼
◾ सुचिकांतजी:
अजून एक..
लहान मुले वयाच्या साधारण 4 ते 5 वयापर्यंत भाषा बोलायला शिकतात.त्यांना ती कोणी शिकवत नाही.घरचे भाषिक संवाद साधतात तेव्हढंच.पण तेच मोठं झालं की एखादी भाषा विशेषत्वाने शिकावी लागते.(अमुक भाषा मी ऐकून ऐकून शिकलो अशी उदा फार कमी असतील बहुतेक)हि नक्की काय प्रक्रिया आहे?....स्वप्नील पाटील
श्रुती पानसे:
असे मेंदं जास्त विकसित असतात.पहिल्या वर्षात सिनॅप्सचा जास्त वेग हे एक कारण!!दुसरं म्हणजे नंतरच्या काळात केंद्रच बदलतं आकलनाचं!!अपरिचिताबद्दल भीती हे ही एक कारण!!बिनधास्त चुका करतात म्हणून लवकर शिकतात!!
◾ मृणाल...मृण्मयी:
म्हणूनच का परकीय भाषा शिकताना मुलाचा मेंदू ती भाषा स्वतःकडे येण्या आधी न्यूरॉन त्याची चाळण करतो ??
श्रुती पानसे:
हो. बरोबर😀
◾ मृणाल...मृण्मयी:
म्हणजे नेमके कसे??
श्रुती पानसे:
फक्त नवी भाषा शिकतानाच नाही.नवी जागा, नवं वातावरण, नवी माणसं
प्रत्येक वेळेला भयंकर सावध
मृणाल...मृण्मयी:
अच्छा..असेही आहे का?
श्रुती पानसे:
कारण ही मानवाची आदिम सवय आहे.झाडं, प्राणी, नव्या गुहा शोधताना सदैव सावध असावं लागायचं स्वत:ची काळजी घेतो आपण.
◾ मृणाल...मृण्मयी:
चाळण म्हणजे या अर्थाने का?
श्रुती पानसे:
हो!!ज्याचा पूर्वानुभव नाही ते सर्व
मृणाल...मृण्मयी:
किती बोलकी क्रिया होत असेल नाही मेंदूत😀
श्रुती पानसे:
एकदा ओळखीचं झालं की भीती आपोआप जाते.👌🏼👌🏼खूप मस्त..न्यूराॅन्स जुळावे लागतात प्रत्येक वेळेला!!
मृणाल...मृण्मयी:
आणि या क्रिया निमिषात घडत असतील नाही!!!
श्रुती पानसे:
हो. कळतही नाही आपल्याला.
◾ मृणाल...मृण्मयी: आता थोडं मुलांकडे आणि शाळेकडे वळूया
श्रुतीताई,
मेंदू आणि शिक्षण हा विषय सर्व शिक्षकांना उपयुक्त आहे. खास करून प्राथमिक शाळांमध्ये. पण या विषयी शिक्षकांना जाणीव आहे असं फार कमी. त्यासाठी आपण (तुम्ही आणि आम्ही) काय करू शकतो? एखादा लहान कालावधीचा अभ्यासक्रम आहे का त्यासाठी? - सुयोगा जठार
श्रुती पानसे:
आपलं रडणं, हसणं, एखाद्याशी विशेष मैत्री तर एखादा न आवडणं हे सर्व काही रसायनांवर अवलंबून असतं.शिक्षक प्रशिक्षण सतत चालू असतंआम्ही त्यासाठी शाळांमध्ये जातो
सुचिकांतजी:
छानच ..
◾ सुचिकांतजी:
पानसें ताई,
आपला परिचय वाचल्यावर काही विचारावे वाटले.. ते... पाळणाघर ते शालांत पर्यंत च्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांना उपयुक्त अशा मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, मेंदू रचना असा आपला व्यापक अभ्यास आहे. यांतील आपल्या आवडीचा विषय कोणता? त्यातील परस्पर संबंधाबद्दल आपण काही सांगू शकाल? - खाडीलकर काका
श्रुती पानसे:
सगळ्याचा मध्यवर्ती विषय एकच - मेंदू.....मेंदूचा विकास वयानुसार!!परिस्थिती आणि वातावरणानुसार बदल होत जातो. तो दरवेळी अभ्यासायचा. हे काम आवडतं!!
◾ सुचिकांतजी:
9 वी 10 वी चे अभ्यासक्रमात व्यक्तीमत्वाचे पैलू आणि विकासाच्या प्रकारात आत्मिक विकास हा नव्याने उपनिषय आला आहे. तो शिकवायला अवघड जातो, त्या बद्दल शिक्षकांचे दृष्टीने काही सांगावे. अनेक शाळांनी या विषयाचे महत्व न ओळखल्याने या विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. याबद्दल आपणास काय वाटते? - खाडीलकर काका
श्रुती पानसे:
सगळ्याचा एकमेकांशी संबंध आहेच..सदसदविवेक बुध्दीला आवाहन लहान मुलांनाही करता येतं.तो आधार मी घेतलाय..शिक्षकांना तर हे खूप छान पध्दतीने करता येतं.कारण त्यांच्यासमोर सतत जिवंत ऊदा. असतात.आत्मा म्हटलं की संकल्पना लांब जाते.पण साध्यासुध्या चांगल्या वागण्यातून आत्मिक विकास होत असतो.
सुचिकांतजी:
👍
◾ मृणाल...मृण्मयी:
लहान मुलांच्या डोक्यात काय घडामोडी चालतात व कोणत्या त्या त्यांच्या वागणुकीतून ओळखता येतात का,आवडी आपण कश्या ओळखाव्यात....अजित राणे
श्रुती पानसे:
😀👌🏼आपण प्रौढांच्या चष्म्यातून पाहिलं तर चुकाच चुका दिसतात त्यांच्या वयाचं होता आलं पाहिजे.तर सगळ काही समजेल.त्यांचं वागणं अतिशय स्वच्छ असतं
रोहिणी बागल:
अगदी खरं✅✅
◾ सुचिकांतजी:
अनेक वेळा शिक्षक किंवा पालक, मुलांना शांत राहा, अमुक करू नका, तमुक करू नका, अशा सूचना देतात, पण तरीही लहान मुलं ऐकत नाहीत, यावर तुमचे निरीक्षण काय सांगते? लहान मुलांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण नसते का?
अमोल शिंपी: छान प्रश्न. माझ्या मनातला.
श्रुती पानसे: काॅर्पस कलोझम या नावाचा एक अवयव असतो तो जोपर्यंत विकसित होत असतो, तोपर्यंत मुलं भरपूर हालचाली करत असतात.साधारण आठ वर्षापर्यत.ती हालचाल त्यांनी करायलाच हवी
◾ सुचिकांतजी:
म्हणजे चंचल असतात असं म्हणायचं आहे का ?
श्रुती पानसे:
हो. मोठ्यांच्या भाषेत😀
हा अवयव आपल्याला मरेपर्यंत साथ देतो.
सुचिकांतजी:
म्हणजे आपल्याला जरी वर्गात बसवले तरी आपण असच करू होना ?
श्रुती पानसे:
हो!!जर त्याअंनी हालचाल केली नाही तर समस्या येतील.9- 1 0 वयानंतर कमी कमी होते हालचाल!!आपण बसू शकतो आठ आठ तास . बालवाडीतली मुलं मुळीच नाही.
◾ सुचिकांतजी:
तुम्ही हसू नका माझ्या मनात एक वेगळा प्रश्न आहे ... धीर करून विचारतो ..
श्रुती पानसे:
हं... 😀 काय?
◾ सुचिकांतजी:
अंगात येणे हा प्रकार आपण नेहमी मोठ्या माणसांच्या बाबतीत बघतो, लहान मुलांच्या बाबतीत नाही... यात मेंदूची काही विशिष्ट भूमिका असते का?
श्रुती पानसे:
मस्त!!मुलं कायमच मोठ्यांचं लक्ष वेधून घ्यायच्या उद्योगात असतात. मोठ्यांना हे मुद्दाम करावं लागतं😀लहान मुलं स्वच्छ असतात.सरळ सरळ हट्ट करून मोकळी होतात😀
सुचिकांतजी:
खरं आहे ..
वृषाली ताई:
नैसर्गिक हक्क बजावतात!
श्रुती पानसे:
अगदी!!मोठ्यांचं जगच वेगळं
सुचिकांतजी:
आता मुलाखतीची सूत्र मृणालकडे देतो ....
◾ मृणाल...मृण्मयी:
पालक म्हणून मुलांच्या अभ्यासात इंटरनेटचा वापर कितपत योग्य आहे?
एखादया प्रश्नाचं उत्तर देताना आपण आंतरजालावर विसंबून राहणं कितपत योग्य वाटतं?....राहुल वेळापुरे
श्रुती पानसे:
खरतर नकोय. त्यापेक्षा प्रत्यक्ष भेट हवी. पुस्तकंही चालतील.पण काळाप्रमाणे बदलायला हवं.मागे राहून चालणार नाही या पिढीला
निवेदिता ताई:
कित्ती perfect निरीक्षण व चपखल कारण!.
मृणाल...मृण्मयी:
मग सुवर्णमध्य कसा साधावा?
श्रुती पानसे:
हाच आहे ज्ञानरचनावाद!!शाळा आणि पालकांनी ठरवल्यास!!पण मुलं सोप्याकडे जाणारच. नाही का?
मृणाल...मृण्मयी:
अच्छा!!!मस्त
◾ मृणाल...मृण्मयी:
ताई,माझे प्रश्न थोडे मुलांच्या भावविश्वकडे जाणारे आहेत..विचारू??थोडी लांबेल
श्रुती पानसे:
हो
◾ मृणाल...मृण्मयी:
भांडणातून आणि निराशेतुन गुंतागुंत होणाऱ्या मुलांना तुम्ही कसे हाताळता??
श्रुती पानसे:
त्यांना आधी शांत करायला हवं.
सहा सात वर्षांच्या मुलांचा आत्मविश्वासही खचतो.आधार मिळाला. विश्वास वाटला तर खुलतात मुलं ..असा अनुभव आहे
मृणाल...मृण्मयी:
भावनिक आधार!!
श्रुती पानसे:
सर्वात महत्वाचा!!अनेकदा अभ्यासात अडचण म्हणून येतात.पण अडचण तिथे नसतेच ब-याचदा मनात असते!!
◾ मृणाल...मृण्मयी:
मग असं म्हणावं का??"......मुलांना त्यांच्या पालकांपासून आधी वाचवा" मुलांवर काम करणे गरजेचे कि पालकांवर??
श्रुती पानसे:
खरय % पालकांवर
◾ मृणाल...मृण्मयी:
अतिअपेक्षा करणारे आणि अतिउपेक्षा करणारे पालक आम्हा पालकांना काय सांगाल यावर तुम्ही...थोडं आमचं समुपदेशन करा🙏
श्रुती पानसे:
अरे, त्यपेक्षा आपसात भांडणारे पालक सर्वात वाईट.
◾ सुचिकांतजी:
हा प्रश्न घ्या .. म्हटलो होतो मृणालना अगोदरच 😄
श्रुती पानसे:
घर शांत ठेवणं सर्वात आवश्यक.
सुचिकांतजी:
भांडकुदळ पालक!!
श्रुती पानसे:
मुलं खूप भांबावतात.गोंधळतात
..हिरमुसतात.परिणामी अस्वस्थ होतात.
मन, शरीर सगळ्यावर वाईट परिणाम होतो.गंमत म्हणजे मुलांनाच दोष देतात.खूपदा!!अपेक्षा, स्पर्धा आहेच असं म्हणतात. पण आपण दूर राहू शकतोच की सगळ्यापासून!!मुलांना समजून घेऊन पाठीशी उभं राहणं इतकी साधी गोष्ट केली तर रस्सीखेच संपेल.
◾ मृणाल...मृण्मयी:
मेंदूचा चांगला विकास होण्यासाठी चांगला आहार घेणे हे गरजेचं आहे पण काही वेळेला आपण बघतो कि गरीब घरचे मुले जे अगदी हातावर कमवून शिक्षण घेतात, त्यांना सकस आहार भेटत नसूनही काही वेळेस अशा घरची मुले देखील शिक्षणात पुढे असतात आणि उच्च पदावर पोहचतात.. ह्या मागे काय कारण आहे..?
........किरण बोडके
श्रुती पानसे:
त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त असते. पण त्या सगळ्या मुलांना सकस आहार मिळाला तर वाट सोपी होईल त्यांची.
मृणाल...मृण्मयी:
अच्छा!!
श्रुती पानसे:
पोषक आहार दिल्याने केवढा फरक पडलाय..एकाग्रता, स्मरणशक्ती यासाठी लोह प्रथिनं हव ते मिळायला हवं.
◾ मृणाल...मृण्मयी:
लहान मुलं जेव्हा मोठ्यांसमोर सफाईदारपणे मोबाईल वापरतात तेव्हा आपण म्हणतो "आजची पिढी हुशार आहे"
परंतु काही पाल्यांच्या बाबतीत त्यांचे हुशार वागणे त्यांच्या शिक्षणात साथ देत नाही..
त्यांचा हा मोबाईलचा / तंत्रज्ञानाकडे असलेला ओढा शिक्षणाकडे, वाचनाकडे त्याच ऊर्जेने कसा वळवता येईल?
......- राहुल वेळापुरे
श्रुती पानसे:
अतिशय अवघड आहे. कारण अवघ्या वातावरण भारलंय मोबाईलमुळे
वृषाली ताई:
राहुल प्रश्न ज्वलंत आहे...
श्रुती पानसे:
मुलं दूर कशी राहू शकतील?
म्हणून तर इ लर्निंग.तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश आपणच केलाय..मुलं यातूनच तर शिकताहेत.चक्र मागे फिरवत येईल?
सुचिकांतजी:
बरोबर .आता काळाप्रमाणे पुढे जायला हवं सर्वच क्षेत्रात ..
◾ मृणाल...मृण्मयी:
रमेश पानसें च्या म्हणण्याप्रमाणे मानसशास्त्राच्या पुढे आकलन शास्त्र आले आहे. ज्या मधे मेंदू मधील ज्ञान ग्रहणावेळच्या प्रक्रीयांचा विचार केला जातो.
पण अजूनही मला वाटते यात मानसोपचार तज्ञ डाॅक्टर्स व मानसशास्त्राचे डाॅक्टर नसलेले अभ्यासक यामधे एकवाक्यता व समन्वय नाही.
तो येण्यासाठी काय करावे असे आपणास वाटते ?
-- प्रभाकर खाडिलकर
श्रुती पानसे:
एकत्र सेमिनार्स घडवून आणायला हवेत असं वाटतः
◾ मृणाल...मृण्मयी:
भारतात 2020 पर्यंत 20% लोकसंख्या मानसिक रुग्ण असण्याची शक्यता आहे.
2001 मध्ये जगाच्या लोकसंख्येच्या 10% इतका मानसिक रुग्णतेचा असणारा दर 2010 पर्यंत 15% वर जाण्याची भीती व्यक्त केली गेली होती.
विविध संस्थांच्या अवहालांनुसार भारतातील 6.7% लोकसंख्या मानसिक रुग्णतेने आजारी आहेत.पैकी 12% हि 6-14 वयोगातील मुलं आहेत.त्या तुलनेत देशात यावर वैद्यकीय सुविधा,दवाखाने आणि समुपदेशन केंद्रे व तज्ञ व्यक्ती यांची कमतरता आहे.या लहान वयोगटासाठी तुमची नेमकी कार्यशैली काय आहे?पुढच्या येणाऱ्या आव्हानास आपण कस सामोरं जाता.....
श्रुती पानसे:
माझ्या कामाचा रोख पालक आणि शिक्षकांवर आहे. ते सुधारलं तर बाकी गोष्टींची गरज पडूच नये
◾ मृणाल...मृण्मयी:
मला dr श्रुती पानसे याना फकत एवढेच विचारायचे आहे की अक्षरनंदन चा अनुभव पालक म्हणून कसा आहे ?? - संध्या भोसले
श्रुती पानसे:
अतिशय चांगला. अपेक्षेपेक्षा चांगला 👍🏼
सुचिकांतजी:
ताई आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखतीसाठी आलात त्याकरता धन्यवाद ..
श्रुती पानसे:
मीच धन्यवाद द्यायला हवेत.मेंदू तल्लख झाला माझा😀
काळपांडे काका:
अतिशय उत्स्फूर्त झाली मुलाखत.
'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे डॉ. श्रुती पानसे यांनी शिक्षणाबद्दल जो अभ्यास केला आहे, त्यांना जे वाटते ते अगदी सहजपणे त्या आपल्यापर्यंत पोचवत होत्या.
अमोल शिंपी:
श्रृतीताईं आपला 'मेंदू आणि शिक्षण' या विषयावरचा पीचडीसाठीचा शोध प्रबंध पीडीएफ स्वरुपात आहे का? तो आम्हाला वाचायला मिळू शकेल का?
त्यात निश्चितच विस्तृत माहिती असेल मेंदूच्या विविध केंद्रांची व घडामोडींची.
उत्सुकता वाढीस लागलीय.
आपल्या मुलाखतीत आपण मेंदूबद्दल इतकी माहीती दिलीय तर शोध प्रबंधात किती असेल?
श्रुती पानसे:
http:///shodhganga.inflibnet.ac.in या वेबसाईटवर प्रबंध आहे माझा.
अजित राणे:
डॉ. श्रुती पानसे यांची मुलाखत खूप छान झाली
आम्हा पालकांना खूप काही शिकायला मिळालं, आमच्या चुका सुद्धा आम्हला कळून आल्या..
धन्यवाद ताई..
सुचिकांतजी:
आज आपण डॉ. श्रुती पानसे यांच्याशी बोललो. मेंदू आणि शिक्षणविषयक अनेक पैलू आपल्यासमोर आले. श्रुती ताईंनी न थकता जवळ जवळ अडीच तासाहून जास्त वेळ आपल्या सर्वांना दिला, त्याबद्दल समूहातर्फे त्यांचे खूप खूप आभार...
॥ज्ञानभाषा मराठी॥
॥माझी शाळा📚माझी भाषा॥☺
No comments:
Post a Comment