अनेक लोक माकडांना खायला घालतात, पण मित्रांनो आपण निसर्गाच्या फायद्याच्या दृष्टीने एक बाब लक्षात घ्यायला हवी.
ही माकडं मनुष्य वस्तीत येऊन, आयतं जेवून आळशी होतात. सहलीच्या ठिकाणी तर यांची मज्जाच असते. झाडावर चढून फळे तोडून खाणे या गोष्टीचा यांना कंटाळा येतो. वेफर्स, कुरकुरे, चपाती, भात असलं जेवायला घालून आपण निसर्गाचं चक्र तोडत आहोत. शिवाय ही माकडं माणसांना रेडी फूड साठी त्रास देतात, हातातले अन्न पळवून नेतात.
माकडं दूर दूर खाण्याच्या शोधात भटकली, यांनी स्वतः झाडावर चढून फळे खाल्ली, तर त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया दूर पर्यंत पडतील, आणि वनांची वाढ होईल. वनांची वाढ न होण्यामागे हे देखील एक कारण आहे.
पहा पटलं तर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना देखील सांगा. माकडांना त्यांचं जेवण स्वतः शोधुद्या, त्यांना आळशी बनवू नका.
- सुचिकांत वनारसे
No comments:
Post a Comment