आज ज्ञानभाषा मराठी समुहात, दिवसभर विविध मराठी पाककृतींवर चर्चा चालू होती. चर्चेच्या शेवटी, समुहातील सदस्य गोपालराज कपाटे बुवांनी लीळाचरित्रातील एक लीळा प्रस्तुत केली.
____________________________
____________________________
लीळाचरीत्र हा महानुभाव संप्रदायाचा मुळ ग्रंथ त्यात आलेली ही छोटीशी लीळा प्रस्तुत विषयाला अनुरूप
सर्वज्ञांचे महाराष्ट्रातील परिभ्रमण चालु होते . सर्वज्ञांचा मुक्काम एका गावी झाला . सर्वज्ञांची शिष्या साध्वी साधाईसा यांना सर्वज्ञांना लाडू तयार करुन अर्पण करावयाची इच्छा उत्पन्न झाली मग सर्व साहित्य जमा करुन त्यांनी लाडु तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली . लाडू तयार करण्यासाठी शेव तळली आणि पाक तयार करण्यासाठी चुलीवर ठेवला आणि पाक तयारहोण्यासाठी थोडा वेळ लागणार होता तेवढ्या वेळात आपण भिक्षा( भिक्षा - हा महानुभाव संप्रदायातील साधकाने आचारावयाचा प्रमुख विधी आज समाजात बहुतेक ठिकाणी महानुभाव साधक ओली भिक्षा ( माधुकरी ) मागताना दिसतील परंतु अन्न मिळत नाही भिक मागणे वेगळे आणि ही भिक्षा आचार आहे म्हणुन महानुभाव साधक भिक्षा मागतात) मागुण येउ हा विचार करुन ही साधाईसा ( नावाप्रमाणे साधीभोळी ) भिक्षा करण्यासाठी निघाली पण भिक्षा विधी नियोजित कालावधी पेक्षा अधिक कालावधी लागला आणि इकडे पाक लागला पण तरीही या मातेने त्याचे लाडू तयार केले व नंतर ते लाडू घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आली सर्वज्ञांना तीने लाडू समर्पित केले पण लाडूंची अवस्था अशी झाली होती की लाडू मुसळनेही फुटेणात यावेळी सर्वज्ञ गमतीने त्या मातेस म्हणतात "बहुते सुगरणी देखील्या परी पाकु चुलीवरी ठेऊनी भिक्षेसी जाये ऐसी सुगरण कही देखीलीची नाही"तीला मात्र वाईट वाटले की मी सर्वज्ञांच्या ठिकाणी चांगला पदार्थ अर्पण करु शकली नाही सर्वज्ञ पुन्हा म्हणतात "बहुते सुगरणी देखील्या परी दहा वीस मुसळे मारुनी लाडू फोडीजे ऐसी सुगरण कही देखीलीची नाही" मग सर्वज्ञांच्या सन्निधानी असणाऱ्या बाईसानी त्या सर्व लाडूंची चुरी करुन ते उपयोगी लावले
- गोपालराज कपाटेबुवा
No comments:
Post a Comment