1) नमस्कृत्य वदामि त्वां ,यदि पुण्यं मया कृतम्।
अन्यस्याम् अपि जात्यां त्वमेव जननी भव ।।
__________________________________
2) प्रथम वयसि पीतं तोयमल्पं स्मरन्त:
शिरसि निहित भारा नारिकेला नराणाम्।
ददति जलमनल्पं स्वादुमाजिवितान्तं
न हि कृतमुपकारो साधवो विस्मरन्ति।।।
अन्यस्याम् अपि जात्यां त्वमेव जननी भव ।।
- अर्थ - (शेवटच्या वेळी दुर्योधन गांधारीमातेला म्हणतो) तुला नमस्कार करून मी सांगतो ,की जर काही पुण्य मी केले असेल तर अन्य जन्मांमध्ये सुद्धा तूच माझी आई हो ! प्रत्येक मातृभक्त याहून वेगळे काय मागेल ?
__________________________________
2) प्रथम वयसि पीतं तोयमल्पं स्मरन्त:
शिरसि निहित भारा नारिकेला नराणाम्।
ददति जलमनल्पं स्वादुमाजिवितान्तं
न हि कृतमुपकारो साधवो विस्मरन्ति।।।
अर्थ - मानवाने नारळाच्या झाडाला (रोपटे होते तेव्हा) जे थोडे पाणी दिले होते त्याची परतफेड ते नारळाचे झाड आयुष्यभर डोक्यावर ओझे बाळगत ,भरपूर,स्वादिष्ट पाणी देत करत असतो. खरोखर सज्जन लोकं केलेले उपकार कधी ही विसरत नाहीत _____________________________________.
३) अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्
अयोग्य पुरुष: नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:।।
अर्थ -मन्त्राच्या योग्यतेचे नाही असे एकही अक्षर नाही , ज्यात औषधितत्त्व नाही असे एकही मूळ नाही ; कोणतीही व्यक्ती अयोग्य नसतेच ,(त्याचा योग्य रितीने उपयोग करून घेणारा) योजक त्या ठिकाणी लाभणे दुरापास्तच आहे .
_______________________________________
४) स जातो येन जातेन याति वंश: समुन्नतिम्
परिवर्तिनि संसारे मृत: को वा ज्ञायते ।।१।।
परिवर्तिनि संसारे मृत: को वा ज्ञायते ।।१।।
अर्थ - तोच खरा जन्मला ज्याच्यामुळे वंशाची उन्नती झाली ,नाही तर या सतत बदलणा-या जगात कोण मेले तरी कळत नाही .
________________________________________
No comments:
Post a Comment